Tuesday, February 16, 2010

रस्त्यावरचा संसार आणि गारठलेली मने

काल रात्रीचा अनुभव....वेळ साडे नऊ पावने दहाची...स्थळ गंगापुर रोडकडुन माई लेले श्रवन विद्यालयाकडे जाणार रस्ता....
पेठ सुरगाना भागातुन रोजगारासाठी आलेली आदिवासी कुटुंबे.रस्त्याच्या कडेला जिथे जागा मिळेल तिथे मांडलेला संसार.तीन दगडांच्या चुलीची धगधग नुकतीच थांबलेली होती.महिला वर्ग भांडीकुंडी आवरन्यात मग्न होता,तर पुरुष मंडळी शेकोटी पेटवुन बसले होते.त्यांना पाहुन मनात विचार आला आपण दारे खिडक्या बंद करुन आणि उबदार कपडे पांघरुन झोपतो तरि सुद्धा थंडीच्या नावाने बोटे मोडतो.हे लोक उघडयावर झोपतात,त्यांचे कसे होत असेल ?विचार करतच पुढे चाललो होतो. शेकोटीपासुन पाच दहा पावलाच्या अंतरावर एक जण एकटाच विडी फुंकत बसला होता.मी त्याला सहज प्रश्न केला `काय राव ,तुम्हाला नाही का थंडी वाजत?` विडीचा झुरका सोडत राव बोलु लागले ,`आमचं काय विचारता साहेब ,ऊन ,वारा,थंडी,पाऊस आम्हाला सगळं सारखंच आहे.लहानपणापासुन आम्हा सगळ्यांना याची सवय असते.शेकोटी म्हनजे आम्हाला एकत्र बसन्यासाठी केवळ निमित्त आहे.आम्हाला कुनालाही थंडी वाजत नाही आणि थंडीमुळे आमच्यातला कुनी आजारीही पडत नाही.थडी फक्त या मोठमोठाल्या इमारतीमध्ये राहनार्यांनाच लागते.या थंडीमुळे ते आजारीच पडतात असे नाही तर थंडीमुळे त्यांची मनेसुद्धा गोठुन जातात...`. राव अजुन बरेच काही बोलायला लागले होते,परंतु हा `गावठीचा` अंमल असेल ,उगीच वांदा नको म्हणुन मी पुढे चालु निघुन गेलो. अर्ध्या पाऊन तासानंतर पुन्हा त्याच रस्त्याने मी परत येत होतो.मधल्या काळात बिगरमोसमी पावसाने आपली हलकीशी हजेरी लावली होती.रस्ता ओला झालेला होता.उतारावरुन पाणी वाहात होते.परत जाताना ते `गावठी`वाले राव मला मर्क्युरीच्या प्रकाशामुळे लांबवरुन दिसत होते.त्याची थोडी मजा घ्यावी असा माझ्या मनात विचार आला. ती आदिवासी कुटुंबे धावपळ करीत होती.अचानक आलेल्या पावसामुळे त्यांची तारांबळ उडाली होती.काही सामान झाकल्यामुळे भिजन्यापासुन वाचले होते तर सामान झाकन्याच्या प्रयत्नात ते आदिवासी भिजले होते.तशाच अवस्थेत ते आपला संसार जैसे थे करन्यात गुंतले होते.ज्यांचे सामान व्यवस्थीत लावले गेले होते ते इतरांना मदत करत होते.मात्र `गावठी`वाले राव रस्त्यावरुन त्यांना सुचना देत होते.जवळ जाऊन मी प्रश्न विचारला,`काय राव पावसामुळे ओले झाले वाटतं ?` माझ्या लहानशा प्रश्नाला रावांनी ताडकन उत्तर दिले,` साहेब,आम्ही नेहमीच ओलेचिंब असतो,तुम्ही कोणालाही हात लावा तो ओलाचिंब सापडेल.समोर पहा तो शिवा,त्याचे सामान लावुन तो दुसर्याला मदत करतो आहे .असा आमचा ओलावा असतो.हा आमचा ओलाव्याचा पाझर कधीच आटत नाही.नाहीतर तुमच्या सारखे सुशिक्षित लोक अशा वेळेस फक्त गंमत पहात राहीले असते,कोरडया पाषानासारखे.` रावांनी माझ्याकडे मोहरा वळवल्यामुळे क्षणभर माझी मतीच कुंठीत झाली.मस्करी करन्याच्या उद्देशाने गेलेलो मी निरुत्तर झालो होतो.आणखी काही ऐकण्याची माझी हिंमत नव्हती म्हनुन मी गुपचुप चालु लागलो. मात्र माझ्या लहान प्रश्नांनी मला भरपुर काही शिकवले होते. रात्रभर मी अंतर्मुख होऊन विचार करत होतो.शहरातील बाबुंसाठी इमारती बांधनार्या या आदिवासी बांधवांची त्या इमारतीमध्ये राहानार्याबद्दल अशी मानसिकता का व्हावी ?? माझ्या गोठलेल्या मनाला ऊब देऊन या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा अयशस्वी प्रयत्न मी अजुन करतो आहे.

कथा न झालेल्या जुलाबाची

 नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेच्या स्थापनेला यंदा ५० वर्ष (सुवर्णमहोत्सव) पूर्ण होत असून त्यानिमित्त माजी विद...