Thursday, September 30, 2010

नाशिक मनपा केशकर्तनालय

आज सकाळी रोजच्या शिरस्त्याप्रमाणे सौ.ने वर्तमानपत्र माझ्या बिछान्याजवळ आणुन ठेवले आणि नको ते झाले.नको तो लेख वाचला आणि माझ्या डोक्यावरचे शिल्लक असलेले केस सरळ ताठ झाले.बातमी तशी जुनीच होती,पण त्यावर उहापोह करनारा लेख होता तो.नाशिक महानगरपालिका त्यांच्या शाळेतील मुलांचे केस कापन्य़ाचे ठेके देनार आहे असे त्यातुन कळले.मी शक्यतोवर नाशिक मनपाच्या बाबतीत छापुन आलेल्या बातम्या वाचत नाही.पुर्वी मी खुन, दरोडे ,भ्रष्टाचार ,बलात्कार,घोटाळे यांच्या बातम्या वाचत नसे.कारण या बातम्या जवळपास सारख्याच माहीती सांगणार्या असतात ,फक्त पात्रांची नावे आणि काही मजकुर बदललेला असतो.आताही मी सोनसाखळी चोरिच्या,वाहनचोरीच्या,वाहन जाळ्पोळीच्या आणि नाशिक मनपाच्या बातम्या कटाक्षाने टाळतो.कारण नाशिक मनपा हा माझ्या द्रुष्टीने एक हास्यास्पद विषय झाला आहे.कालच एका नागरीकाने नाशिक मनपाची `सानप बाबा आणि त्यांचे ११३ चोर ` अशी संभावना केली.अर्थात मी त्यांच्या या मताशी पुर्णपणे सहमत होतो असे नाही.हाताची सगळी बोटे सारखी नसतात असे मी त्यांना सांगितले.त्यांच्यातही काही सज्जन आहेत असे मी सांगीतले.(संतसज्जन नव्हे !!! नाहीतर काहीजण स्वत:बद्दल उगाच गैरसमज करुन घेतिल).पण त्यांनी माझे म्हनणे काही केल्या मानले नाही.असो.
विषय मनपाच्या केस कर्तनाचा होता.ज्यांच्या डोक्यात काहीच नाही अश्या मुलांच्या डोक्यावरचे केस कापण्याची कल्पना कोणाच्या तरी( ठेकेदाराने उधार दिलेल्या)डोक्यात आली आणि त्याच्या अंमलबजवनीची आता तयारी चालु आहे.खरे तर मनपाच्या शाळांची आधीच इतकी दुरावस्था आहे की विचारता सोय नाही.पंचवटीतील एका शाळेत काही दिवसांपुर्वी जाण्याचा योग आला तेव्हा तेथील मुले पोषण आहार खात होती आणि शेजारी डुकरांचा मुक्त संचार होता.शिक्षक गप्पा मारन्यात गुंग होते आणि मुले डुकरांपासुन बचाव करत जेवण करत होती.
कालचाच एक किस्सा सांगतो.काल सायंकाळी एका खाजगी रुग्णालयात गेलो होतो.गेल्याच वर्षी मनपाच्या शाळेतुन दहावी नापास झालेली एक मुलगी तेथे मदतनीस म्हनुन काम करत होती.नेहमी जाण्यायेण्यामुळे ती मला ओळखत होती.सुर्य अस्ताला चालला होता.ते सुंदर दृष्य एकजण आपल्या मोबाईलच्या कॅमेर्यात टिपत होता.तेव्हा तिने मला विचारले ,`काका,हा सुर्य कुठे मावळतो ?`तेव्हा मी तिला सुर्य उगवणे म्हनज़े काय आणि मावळतो म्हनजे काय हे समजवण्याचा प्रयत्न केला.पण तिच्या डोक्यात काही ते शिरले नाही.सुर्य मावळतो म्हणजे तो एखाद्या गावाला मुक्कामाला जातो अशी तिची ठाम समजुत !!पुर्व ,पश्चिम ,दक्षिन ,उत्तर ह्या दिशा आहेत हे सुद्धा तिला माहीती नाही.अशी अवस्था मनपाच्या शाळांची असल्यावर आता मास्तरांनी मुलांना शिकवायचे कि त्यांचे केस भादरायचे ???बरे केसकर्तनकार शाळाशाळात फिरणार कि एखाद्या पुढार्याच्या नावाने मोठे केशकर्तनगृह उभारुन मास्तर मास्तरीण मुलांना तेथे नेणार ??? मनपातील विरोधी पक्ष याला कुठे विरोध करणार की नेहमीसारखे `मी मारल्यासारखे करतो तु रडल्यासारखे कर ` ही भुमिका घेतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
काहीही केले तरी मुलांच्या भादरलेल्या केसांवर नगरसेवक गब्बर होणार आणि शिक्षणाचा बट्ट्याबोळ होणार हे निश्चित !!

कथा न झालेल्या जुलाबाची

 नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेच्या स्थापनेला यंदा ५० वर्ष (सुवर्णमहोत्सव) पूर्ण होत असून त्यानिमित्त माजी विद...