Thursday, April 27, 2023

कथा न झालेल्या जुलाबाची

 नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेच्या स्थापनेला यंदा ५० वर्ष (सुवर्णमहोत्सव) पूर्ण होत असून त्यानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. स्कॉलरशिपच्या परीक्षेत जिल्ह्यात पास होणाऱ्या पहिल्या ३० विद्यार्थ्यांना विद्यानिकेतनमध्ये पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षणासाठी प्रवेश मिळत होता. आजसारखे वाड्यावस्त्यांवर इंग्रजी शाळांचे पीक आलेले नव्हते. म्हणून विद्यानिकेतन आपले वेगळेपण आणि महत्व टिकवून होते. अशा शाळेत मला शिकायला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो. माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळाव्यानिमित्त मात्र जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्या आठवणीतली एक घटना आठवली तर पोट दुःखेपर्यंत हसू येते. 

                            साधारण ८३/८४ ची घटना असेल. मी तेव्हा सहावीला होतो. एकेदिवशी रोजप्रमाणे शाळा सुरु झाली. तेव्हा विद्यानिकेतनच्या आवाराबाहेर गुंजाळनगरमध्ये 'सेवासदन' या इमारतीत आणि आजूबाजूच्या काही इमारतीत शाळेचे वर्ग भरत असत.त्यादिवशी दुसरा तिसरा तास सुरु असेल.आमच्या वर्गातल्या एका मुलाने सरांकडे तक्रार केली, सर, पोट दुखत आहे. जोराची शी लागली. 'सरांनी तात्काळ त्याला होस्टेलवर जायची परवानगी दिली. सोबत दुसऱ्या मुलाला पाठवले.दोघे बहाद्दर मोठ्या आनंदात होस्टेलकडे निघाले. जाताना दुसऱ्या वर्गातल्या मित्राला 'डब्याला 'चाललो असे हाताने खुणावले. मग त्यानेही सरांना सांगितले, 'सर, माझे पोट दुखते आहे.' सरांनी त्यालाही होस्टेलवर जायला सांगितले. इकडे मुलांना गुरुकिल्लीच सापडली होती.एक एक करून सगळ्या मुलांच्या पोटात दुखायला लागले. शिक्षकांमध्येही खळबळ माजली. सगळ्या वर्गांना तातडीने होस्टेलला परत पाठवले.होस्टेलला तीनच टॉयलेट होते. तिथे काही मुले नंबर लावून उभे. बाकीचे मुले डब्बे भरून भावडी नदीच्या पात्रात रांगेने बसलेली. सगळे विद्यार्थी शाळेच्या गणवेशात होती. त्यामुळे भावडीचे पात्र रंगेबेरंगी दिसत होते. विद्यानिकेतन देवळा नाशिक रस्त्यावर असल्यामुळे नदीपात्रातले दृश्य पाहून बातमी सगळीकडे पसरली होती. शाळेने तात्काळ वैद्यकीय पथक बोलावून मुलांवर उपचार सुरु केले होते. देवळा गावातले खाजगी प्रॅक्टिस करणारे डॉक्टरही मदतीला धावून आले होते. मुलांना विषबाधा झाली की काय या शंकेने सगळे चिंतातुर झाले.होस्टेलच्या स्वयंपाकी मंडळींचे धाबे दणाणले. जे जे डब्बा घेऊन पळत पळत भावडीच्या पात्रात गेले त्यांच्यावर परत आल्यावर उपचार सुरु झालेत. काही डॉक्टर प्रत्यक्ष भावडीच्या पात्रात जाऊन परिस्थितीची पाहणी करून आलेत. यथावकाश सर्वांना बरे वाटायला लागले.आणि दुसऱ्या दिवशी एकेकजण कबुल व्हायला लागला . मला काहीच झाले नव्हते रे, पण तुम्ही जात होते म्हणून मी पण पळत पळत गेलो. मुलांना या प्रकाराची गम्मत वाटत होती. जुलाब थोड्या मुलांना झाले असतील पण बाकीचे जात आहेत तर मग आपण पण गेले पाहिजे अशी बऱ्याच मुलांची मानसिकता होती.अर्थात आम्हीसुद्धा 'न झालेल्या जुलाबाच्या साथीने हैराण होऊन भावडीच्या पात्रात हजेरी लावली होती. पण या खेळात वसतीगृहाच्या त्यावेळच्या रेक्टरना (बहुतेक पाटोळे सर किंवा रा.को. निकम) यांना बदलीच्या स्वरूपात शिक्षा भोगावी लागली. अशी ही जुलाबाची घटना आठवली तर हसून हसून पोट दुखते.


Friday, April 21, 2023

😢 पश्चातापाचे अश्रू 😢

 


समाजबांधवांनो
जय शिवराय 🚩
गेल्या १३ वर्षांपासून मराठा समाजातील वधूवरांचे लग्न जमवताना हजारो पालकांशी संबंध आला.अनेक भलेबुरे अनुभव आलेत.ते मी वेळोवेळी शब्दबद्ध करून समाजासमोर मांडत असतो.असाच एक अनुभव मी आज सांगणार आहे.
समाजबांधवांनो ,गेल्या महिन्यात मी माझ्या एका नातेवाईकाच्या लग्नासाठी मालेगाव येथे गेलो होतो.तिथे मंगल कार्यालयात एक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे नेते भेटले.त्यांनी मला भेटताच कडकडून मिठी मारली आणि त्यांच्या सोबत असलेल्या वऱ्हाडींना माझी ओळख करून दिली.ओळख करून देताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.दिवाळीच्या आधी त्यांच्या मुलीचे लग्न माझ्या माध्यमातून जमले होते त्यामुळे ते आनंदाश्रू असतील असे मला वाटले आणि मी त्या उपस्थितांना तसे बोलून दाखवले. मात्र नेत्यांनी लगेच माझे म्हणणे खोडून टाकले व सांगितले की हे आनंदाश्रू नाही तर हे पश्चातापाचे अश्रू आहेत.मी तुमचे मूल्यमापन करण्यात चुकलो होतो.तरीही तुम्ही मला मोठ्या मनाने माफ करून सहकार्य केले त्याबद्दल मी तुमचा जन्मभर ऋणी राहीन.क्षणभर आम्ही सर्व अवाक झालो आणि पटकन दुसऱ्या विषयावर चर्चा सुरु केली .
समाजबांधवांनो ,या अश्रूंची पार्श्वभूमी अशी आहे की, सदर वधूपिता हे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे नेते होते.त्यांची कन्या लग्नाची होती.त्यासाठी ते स्थळ शोधत होते. नेते ज्या खात्यात नोकरीला होते त्या खात्याच्या गावोगाव ,वाडीवस्त्यावर शाखा होत्या.त्यामुळे त्यांचा दांडगा जनसंपर्क होता.कार्यकर्त्यांचे मोहोळ होते.संघटनेत त्यांच्या शब्दाला किंमत होती.तरीही त्यांच्या मुलींसाठी सुयोग्य स्थळ सापडत नव्हते. त्यासाठी सुमारे तीन वर्षांपूर्वी त्यांनी माझ्याशी संपर्क केला.तेव्हा मी त्यांना नावनोंदणीची पद्धत व नोंदणी फी सांगितली.मी माझ्या संघटनेतल्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या मुलामुलींची तुमच्याकडे नाव नोंदणी करायला सांगतो पण माझी फी घेऊ नका असे त्यांनी मला सांगितले. अशा मनोवृत्तीची मला फार चीड असल्यामुळे मी त्यांना तात्काळ फटकारले. ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशा हजार मुलींचे बायोडाटा मला आणून द्या ,त्यांच्याकडून एक रुपयाही फी घेणार नाही .मात्र तुम्ही डबल पगारी आहात तर तुम्हाला फी द्यावीच लागेल असे त्यांना बजावून सांगितले.त्यांनी नाव नोंदणी केली नाही पण त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा एक व्हाट्सअप ग्रुप तयार करून सर्वांनी आपापल्या ओळखीतल्या मुलामुलींचे परिचयपत्रे तेथे टाकावेत असे फर्मान सोडले. हेमंत पगार यांच्याकडे कोणीही नाव नोंदणी करू नये असेही ग्रुपच्या माध्यमातून आवाहन केले. त्यांच्या कार्यकर्त्यांपैकी अनेक जण माझे मित्र,नातेवाईक होते तर अनेकांनी आधीच त्यांच्या मुलामुलींचे माझ्याकडे नाव नोंदवलेले होते.त्यापैकी काहींनी त्या आवाहनाचा स्क्रिन शॉट काढून मला पाठवला.असे अनेकजण भेटतात म्हणून मी त्या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले आणि विसरून गेलो.चारसहा महिन्यानंतर सर्वांचा उत्साह आटला व तेच ते बायोडाटा पाहून सर्व कंटाळले आणि ग्रुप बंद पडला .
मध्यंतरी दोन अडीच वर्षाचा काळ लोटला.नेत्यांच्या मुलीला काही यॊग्य स्थळ सापडत नव्हते. घरात नेत्यांमध्ये आणि बायकोमध्ये कुरबुरी चालू झाल्या होत्या.बायको,कार्यकर्ते सगळे सांगत होते हेमंत पगारांकडे नाव नोंदणी करा.पण नेते कोणाचे ऐकत नव्हते. माझा मित्र असलेल्या व नेत्यांच्या एका उत्साही कार्यकर्त्याने परस्पर मुलीचा बायोडाटा व फोटो पाठवून दिला व नोंदणी फी फोन पे ने पाठवून दिली.जोपर्यंत मुलीचे पालक स्वतः जबादारी देत नाहीत,तोपर्यंत मी नावनोंदणी करणार नाही.उद्या त्यांनी काही आक्षेप घेतला तर त्याला जबाबदार कोण असे सांगून मी आलेली फी परत पाठवून दिली.
सदर खात्यात काम करणारा जो कोणी भेटला तो मला नेत्यांच्या मुलीला स्थळ पाहायला सांगत होता. विरोधी संघटनेत काम करणारे खिल्ली उडवत होते .
एका दिवशी या संघटनेत काम करणाऱ्या माझ्या मित्रांचा फोन आला,हेमंत तू उद्या ऑफिसला आहेस का ? तुला भेटायला यायचे आहे.मी होकार दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसबाहेर गाडी येऊन उभी राहिली.पांढरे शुभ्र कपडे घातलेले सर्व मंडळी नेत्यांबरोबर ऑफिसमध्ये आल्यावर लक्षात आले की हे नेत्यांच्या मुलीचे नाव नोंदवायलाच आलेले आहेत.झाले गेले विसरून जा आणि नाव नोंदवून घ्या असे सर्व जण सांगत होते. नेते मात्र खजीलपणे शांत बसले होते .शेवटी मीच त्यांना बोलते केले .माझ्याबद्दलचा मनातला द्वेष काढून टाका ,मी येथे कोणाचे वाईट करण्यासाठी बसलेलो नाही असे त्यांना सांगितले आणि मुलीचे नाव नोंदवून घेतले.
समाजबांधवांनो , मला सांगायला आनंद वाटतो की, सप्टेंबर मध्ये नावनोंदणी केल्यानंतर अवघ्या महिन्याभरात मुलीचे लग्न जमले आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये दणक्यात साखरपुडा झाला.
केवळ फी मागितली म्हणून माझ्याबद्दल द्वेष बाळगल्यामुळे लग्नाला उशीर केला आणि घरातल्या सर्वांचे मनस्वास्थ खराब केले.त्याचाच पश्चाताप त्यांना मालेगावच्या भेटीत झाला आणि डोळ्यात अश्रू तरळले. हे पश्चातापाचे अश्रू आहेत असे त्यांनी स्वतःच कबूल केले.
असे अनेक जण आहेत.लग्नामध्ये लाखो रुपये खर्च करतील पण नाव नोंदणी फी सांगितली की मलाच प्रवचन देतात आणि मुलामुलींचे वय वाढेपर्यंत स्थळ शोधत फिरतात.
May be a close-up of 1 person


All reactions:

Thursday, March 23, 2023

मराठा मुलांची ४ व मुलींची ११ स्थळे

 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬

 *मराठा शुभ लग्न व्हाट्सअप बुलेटिन* 

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

 *समाजबांधवांनो* 

 *जय शिवराय* 🙏🚩

 *------------------------------* 

 *मराठा मुलांची ४ व मुलींची ११ स्थळे* 

 *------------------------------* 

         👨🏻‍💼 *मुलांची स्थळे* 👨🏻‍💼 

 *------------------------------* 

🌹१)नाव- *गणेश* 

🌹शिक्षण- *I.T.I.,D.C.E.* 

🌹गणेश हे *कळवण* तालुक्यातील रहिवासी असून *नाशिक येथे नोकरीस* आहेत.

 *https://bit.ly/3ncLKIH

 *------------------------------* 

🌹२)नाव- *दर्शन* 

🌹शिक्षण- *B.E.Mech.* 

🌹दर्शन हे *मालेगाव* तालुक्यातील रहिवासी असून *पुणे येथे नोकरीस* आहेत.त्यांचे *पालक नाशिक येथे स्थायिक* आहेत.

 *https://bit.ly/3TF62GY

 *----------------------------* 

🌹३)नाव- *आशुतोष* 

🌹शिक्षण- *D.M.E.,B.E.(Mech.),M.Tech.(Machine Design)* 

🌹आशुतोष हे *चोपडा* तालुक्यातील रहिवासी असून *पुणे येथे नोकरीस* आहेत.त्यांचे *पालक अमळनेर येथे स्थायिक* आहेत.

 *https://bit.ly/3TBKBpX

 *-----------------------------------* 

🌹४)नाव- *कुणाल* 

🌹शिक्षण- *B.E.Comp.* 

🌹कुणाल हे *नांदगाव* तालुक्यातील रहिवासी असून *सिंगापूर येथे नोकरीस* आहेत.त्यांचे *पालक नाशिक येथे स्थायिक* आहेत.

 *https://bit.ly/3JHFeB4

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

           👩🏻‍💼 *मुलींची स्थळे* 👩🏻‍💼

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

🌹१)नाव- *निकिता* 

🌹शिक्षण- *D.C.E.,B.E.(Civil),Dip.Interior Design &Decoration* 

🌹निकिता या *साक्री* तालुक्यातील रहिवासी असून *बेंगलोर येथे नोकरीस* आहेत.त्यांचे *पालक नाशिक येथे स्थायिक* आहेत.

 *https://bit.ly/3njgSpC

 *-----------------------------* 

🌹२)नाव- *तनुजा* 

🌹शिक्षण- *D.C.E.,B.Tech.Civil* 

🌹तनुजा या *मालेगाव* तालुक्यातील रहिवासी असून *पुणे येथे नोकरीस* आहेत.त्यांचे *पालक देवळा तालुक्यात स्थायिक* आहेत.

 *https://bit.ly/3JEspaJ

 *--------------------------* 

🌹३)नाव- *गौरी* 

🌹शिक्षण- *M.Pharm.(Pharmacagnosy)* 

🌹गौरी या *संगमनेर* तालुक्यातील रहिवासी आहेत.

 *https://bit.ly/3lAyKvY

 *-------------------------* 

🌹४)नाव- *प्रनौती* 

🌹शिक्षण- *B.P.Th.* 

🌹प्रनौती या *बागलाण* तालुक्यातील रहिवासी असून *फिजीओथेरपीस्ट* आहेत.

 *https://bit.ly/3ngF0sZ

 *--------------------------* 

🌹५)नाव- *सुरुची* 

🌹शिक्षण- *B.Tech.(Food Tech.)* 

🌹सुरुची या *नांदगाव* तालुक्यातील रहिवासी असून *पुणे येथे नोकरीस* आहेत.

 *https://bit.ly/40w8iSK

 *---------------------------* 

🌹६)नाव- *कल्याणी* 

🌹शिक्षण- *B.E.Civil* 

🌹कल्याणी या *साक्री* तालुक्यातील रहिवासी असून *पुणे येथे नोकरीस* आहेत. 

 *https://bit.ly/40LEOkj

 *--------------------------* 

🌹७)नाव- *प्रियांका* 

🌹शिक्षण- *B.Pharm.* 

🌹प्रियांका या *बागलाण* तालुक्यातील रहिवासी असून *वापी येथे नोकरीस* आहेत.

 *https://bit.ly/3JC6T6n

 *---------------------------* 

🌹८)नाव- *सलोनी* 

🌹शिक्षण- *D.Pharm.,BSc.* 

🌹सलोनी या *मालेगाव* तालुक्यातील रहिवासी आहेत.

 *https://bit.ly/3n81jRD

 *---------------------* 

🌹९)नाव- *अपूर्वा* 

🌹शिक्षण- *B.Sc.(Agri.),M.B.A.(Agri..)* 

🌹अपूर्वा या *देवळा* तालुक्यातील रहिवासी असून *पुणे येथे नोकरीस* आहेत.त्यांचे *पालक मालेगाव येथे स्थायिक* आहेत.

 *https://bit.ly/409974p

 *----------------------------* 

🌹१०)नाव- *मोहिनी* 

🌹शिक्षण- *M.Sc.Botany* 

🌹मोहिनी या *देवळा* तालुक्यातील रहिवासी असून *मालेगाव तालुक्यात प्राध्यापिका* आहेत.

 *https://bit.ly/3lyllEy

 *-----------------------------* 

🌹११)नाव- *प्रियांका* 

🌹शिक्षण- *M.Pharm.2 nd year* 

🌹प्रियांका या *बागलाण* तालुक्यातील  रहिवासी आहेत.

 *https://bit.ly/3FKmNL2

-------------------------------

वरील स्थळांची *जन्म तारीख,उंची व सविस्तर माहिती* पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा .

आपल्या स्थळास ही स्थळे अनुरूप असतील तर *online interest* पाठवा किंवा माझ्याशी *8275583262* या नंबर वर संपर्क साधा.

Wednesday, March 22, 2023

💪🌹 *यशोगाथांचे पंचक* 🌹💪








 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬

 💪🌹 *यशोगाथांचे पंचक* 🌹💪

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

समाजबांधवांनो,

जय शिवराय 🙏🚩

 *मराठा शुभ लग्न डॉट कॉम*  www.marathashubhlagna.com  च्या माध्यमातून *दि.१७ व १८ मार्च* रोजी *पाच विवाह* संपन्न झालेत.त्यांची माहिती पुढीलप्रमाणे...

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

        🌹 *दि.१७ मार्च २३* 🌹

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

🌹१) *मानूर ता.कळवण* येथील *कै.अण्णाजी दादाजी पवार* यांचे सुपुत्र *चि.राहुल (MV16662)* यांचा शुभविवाह *वाखारी ता.नांदगाव (ह.मु.नाशिक)* येथील *श्री.माधव खुशाल चव्हाण* यांची सुकन्या *चि.सौ.कां.शितल (MV14437)* यांच्याशी संपन्न झाला. 

 *--------------------------* 

🌹२) *दह्याने (पाळे) ता.कळवण* येथील रहिवासी *श्री.माणिकराव रामभाऊ आहेर (पाटील)* ह.मु.अभोणा ,यांचे सुपुत्र *डॉ.चि.वैभव (MV15586)* यांचा शुभविवाह *पोहणे ता.मालेगाव* येथील रहिवासी *श्री.भाऊसाहेब बारकू भामरे* यांची सुकन्या *चि.सौ.कां.डॉ.रश्मी (MV15073)* यांच्याशी संपन्न झाला. 

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

           🌹 *दि.१८ मार्च २३*🌹 

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

🌹३) *दाभाडी ता.मालेगाव* येथील रहिवासी *श्री.नंदलाल रामदास निकम* यांची सुकन्या *चि.सौ.कां.मनाली (MV14767)* यांचा शुभविवाह *कौळाणे ता.मालेगाव* येथील रहिवासी *श्री.पांडुरंग राजाराम बच्छाव* यांचे सुपुत्र *चि.विशाल (MV16093)* यांच्याशी संपन्न झाला.

 *----------------------------* 

🌹४) *धमनार ता. साक्री* येथील रहिवासी *श्री.सुनील रुपचंद खैरनार* यांची सुकन्या *चि.सौ.कां.डॉ.हिमानी (MV15463)* यांचा शुभविवाह *गिधाडे ता.शिरपूर* येथील रहिवासी *श्री.किशोर नथू साळुंखे* (ह.मु.धुळे) यांचे सुपुत्र *चि.निलेश (MV16039)* यांच्याशी संपन्न झाला.

 *------------------------* 

५) *कौळाने (नि) ता. मालेगाव* येथील रहिवासी *श्री.सुनील सुखदेव बच्छाव* यांचे सुपुत्र *चि. संदीप (MV16230)* यांचा 🌹 *पुनर्विवाह*🌹 *न्यायडोंगरी ता. नांदगाव* येथील रहिवासी श्री. *साहेबराव दामू मगर* यांची सुकन्या *चि.सौ.का. उन्नती (MV15095)* यांच्याशी थाटामाटात संपन्न झाला.

Monday, October 17, 2022

*डबल ढोलकी*

 मित्रांनो,

जय शिवराय
तुम्हाला आश्चर्य वाटले असेल हेमंत पगार यांनी स्थळांची माहिती पाठवण्याऐवजी डबल ढोलकी म्हणून काय पाठवले ? ते सर्व सांगण्याआधी डबलढोलकीला दुतोंडी किंवा गांडूळ हे पर्यायी शब्दही वापरले जातात हे सांगून ठेवतो. *बोलायचे एक आणि करायचे त्याच्याविरुद्ध अशा प्रवृत्तीच्या लोकांना महाराष्ट्रात डबल ढोलकी असे म्हटले जाते.* अशाच एका डबल ढोलकी पालकाचा किस्सा तुम्हाला सांगतो.
झाले असे की, काल एका पालकाचा मला फोन आला होता.त्यांनी त्यांच्या मुलाचे माझ्याकडे नाव नोंदवलेले आहे.फोनवर त्यांनी मेळावा कसा झाला ? माझी तब्बेत कशी आहे ? अशी बरीच चौकशी केली.ते कामापेक्षा जास्त गोड बोलत होते त्यामुळे *कुछ तो गडबड है* असे लगेच माझ्या लक्षात आले. हे महाशय व त्यांच्या पत्नी मुलाचे नाव नोंदवायला व त्यानंतर दोन तीन वेळा माझ्याकडे येऊन गेले आहेत.प्रत्येकवेळी त्यांचे म्हणणे असायचे की आम्हाला हुंडाबिंडा काही नको फक्त चांगली माणसे व चांगली मुलगी पाहिजे.आम्हाला मुलगी नाही. त्यामुळे आम्ही तिलाच मुलगी मानू. आज मात्र ते नेमके याच्या उलट बोलत होते.त्यांनी मला असे सांगितले की तुमच्या वेबसाईटच्या माध्यमातून आमचे एका ठिकाणी लग्न ठरल्यासारखेच होते,पण मुलीचा बाप भलताच शहाणा होता म्हणून काही ठरले नाही.तुम्हाला मध्यस्थी करता आली तर बघा असा प्रस्ताव त्यांनी मला दिला.नक्की काय झाले असे मी त्यांना विचारले तर म्हणतात कसे,आम्ही दोनेक महिन्यांपूर्वी एक मुलगी पसंत करून ठेवली होती.पितृपक्ष संपल्याबरोबर लग्नाची पक्की बोलणी करण्यासाठी मुलीच्या पालकांसोबत बैठक झाली.अहो मी त्यांना सांगितले की हुंडाबिंडा काही नको फक्त मुलीच्या अंगावर ३० तोळे सोने घाला.तर त्यांनी फक्त २० तोळ्याची तयारी दाखवली.आमचे म्हणणे ऐकायला तयारच नाही. म्हणून आम्ही पुढची बोलणी बंद केली. तुम्ही जरा त्यांना समजावून सांगा.
मी त्यांना सांगितले की ,मुळात मी अशी काही कामे करत नाही.पण त्यांना समजावण्यापेक्षा तुम्हाला नक्की समजावू शकतो. तुम्ही तर मला नेहमी सांगत होते की आम्हाला हुंडा बिंडा काही नको फक्त चांगली मुलगी आणि चांगले कुटुंब पाहिजे.मग आता सोने तरी कशाला मागतात ? *हा सुद्धा एक प्रकारे हुंडाच झाला.* प्रत्येक मुलीचा बाप त्याच्या स्वखुशीने किंवा ऐपतीप्रमाणे न मागता देतच असतो.मग २० तळ्यावर समाधान मानायला काय हरकत आहे. शिवाय दर महिन्याला एक तोळा सोन घेईल एवढा मुलीचा पगार आहे.शेवटी हा तुमचा आपापसातला मामला आहे .
त्यांना माझ्या स्वभावाची कल्पना नसेल म्हणून एवढे ऐकून सुद्धा त्यांनी मला पुन्हा आग्रह केला की तुम्ही त्यांना शब्दभर सांगून पहा.तीस तोळे देत असतील तर पुढे जायला काही हरकत नाही. अशा वेळेस मात्र मी माझा संयम गुंडाळून ठेवतो आणि अशा *लालची* लोकांना, भले ते वयाने ,शिक्षणाने,ऐपतीने मोठे असले तरी,त्यांना धडा शिकवायची संधी सोडत नसतो. या संधीचा मी पुरेपूर फायदा घेऊन त्यांची *डबलढोलकी मनसोक्त बडवली* आणि पुन्हा फोन करू नका असे ठणकावून सांगितले.
*--------------------*
@ *हेमंत पगार* ,
मराठा शुभ लग्न डॉट कॉम,
नाशिक .
8275583262.

Saturday, April 16, 2022

नियती इतकी क्रूर असू शकते का ?

 

आज बरोबर दोन महिने झालेत त्यांच्या स्पेशल व्हॅलेंटाईन डे ला.
माहित नाही का पण तो त्या दिवशी खुशीत होता आणि तिला म्हणाला आज तुला व्हॅलेंटाईन डे ची पार्टी देतो.
आपल्या दोन मुलांसमोर ती लाजतच म्हणाली लग्नाला इतके वर्ष झालेत आणि आज काय सुचलं तुम्हाला व्हॅलेंटाईन डे ला पार्टी द्यायला.
त्याने मुलांनाही पार्टीचा आग्रह केला .पण मुलं शहाणी. आम्ही कशाला तुमच्या दोघांच्यात .तुम्हीच साजरा करा व्हॅलेंटाईन डे असं म्हणून मुलांनी बापाची पार्टीची ऑफर नाकारली आणि दोघांना प्रायव्हसी दिली .
तसा तो नाशिकच्या एका मोठ्या हॉटेलात नोकरीस होता.हॉटेलच्या भारतभर असलेल्या शाखांमध्ये त्याला वर्षातून पाच दिवस मोफत राहायला मिळत होते.त्याचा ते दरवर्षी आनंद घेत.
पण आजचा दिवस त्याला दुसऱ्या हॉटेलमध्ये पार्टी करायची होती.म्हणून त्याने त्रंबक रोडवरची हॉटेल निवडली. दोघेही छान नटूनथटून गेले. जाताना एका दुकानात थांबून त्याने तिला कानातल्या रिंग घेऊन दिल्या.
इकडे आमच्या बिल्डिंगमधल्या महिलांची हळदीकुंकवाची धावपळ चालू होती. सगळ्या महिला एका घरी जमल्या होत्या.माझी बायकोही त्यांच्यात होती.पाच पंचवीस बायांचा तो नेहमीचा ग्रुप जमला होता.पण त्या घोळक्यात ती मात्र नव्हती.नवऱ्याबरोबर व्हॅलेंटाईन डे ची पार्टी एन्जॉय करत होती.अचानक कुणालातरी आठवलं .अरे ती अजून आली नाही. एकीने लगेच कॉमेंट केली. अरे ती नेहमीच स्लो असते येईल थोड्या वेळात. सगळ्या खळखळून हसल्या.अरे ती स्लो आहे पण भोळी आहे हं, दुसरीने तिची बाजू मांडली.माझ्या बायकोने गुप्त बातमी जाहीर केली.अरे ती स्लो वैगरे काही नाही हं .मस्तपैकी नवऱ्याबरोबर व्हॅलेंटाईन डे ची पार्टी करायला गेली आहे.असा हास्य विनोद चालू असतानाच ती हळदीकुंकूवाला हजर झाली.
सगळ्यांनी तिची खूप मस्करी केली .या वयात व्हॅलेंटाईन डे साजरा करते. तू नशीबवान आहेस. असे बोलून तिला चिडवत होते.तीही मस्त यांच्यात सामील झाली.
आज या गोष्टीला बरोबर दोन महिने झालेत.
आज ती घरात नवऱ्याचा जीव वाचावा म्हणून मृत्युंजय जप करते आहे.
तिला अजूनही माहित नाही की तिचा नवरा दोन दिवसांपूर्वीच लांबच्या प्रवासाला निघून गेला आहे.
ती आजारपणाने खूपच अशक्त झालेली आहे म्हणून तिला लगेच काही सांगू नका असे सर्वांचे ठरले होते.
सध्या पसरलेल्या जीवघेण्या आजारातून बरे झाल्यावर दोन दिवसांपूर्वी तिला जेव्हा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला तेव्हा तो व्हेंटिलेटरवर होता.
त्याला शेवटचे पाहताना तिने डॉक्टरांना विचारले ,आमच्या `यांना` कधी डिस्चार्ज देणार आहेत ?
डॉक्टरही निशब्द होते .
जसे आज आम्ही आहोत.
कारण आम्हीही आमचा एक चांगला मित्र गमावलेला होता.
म्हणून विचारावेसे वाटते,
नियती इतकी क्रूर असू शकते का ?
मित्रा ,तुला भावपूर्ण श्रद्धांजली .

Friday, April 1, 2022

 

😎

दोनाचे चार झाले

😎

काय योगायोग आहे बघा. तारीख २/२/२२ म्हणजे चार वेळा दोन.या दिवशी माझे दोन डोळ्यांचे चार डोळे झालेत. उपवर मुलामुलींचे दोन हाताचे चार हात करताकरता माझे दोन डोळ्यांचे चार डोळे झालेत असे मी आता म्हणू शकतो. मित्रांनो,गेल्या काही दिवसांपासून मला दृष्टिदोष जाणवत होता.एका मित्राने सांगितले,दुनियामे बुराई इतनी हो गयी कि आंखे भी कुछ देखणा पसंद नही करती.असेच काहीतरी असेल म्हणून परवाच्या गांधी पुण्यतिथीला मी बुरा मत देखो चा प्रयोग करून पाहिला.सकाळी उठल्यापासून डोळ्यांवर घट्ट पट्टी लावून मी घरात फिरत होतो. डोळे बंद असतानासुद्धा घरात मी सराईतपणे फिरत होतो. मात्र ऑफिसला जायला निघालो तेव्हा पार्किंग मध्ये ठिकठिकाणी ठेचकाळत होतो.काही अघटित नको घडायला म्हणून बुरा मत देखो चा प्रयोग अर्ध्यावरच सोडून डोळ्यावरची पट्टी काढून टाकली आणि डॉक्टरचा सल्ला घ्यायचे ठरवले.त्याचा मुहूर्त आज २/२/२२ ला सापडला .डॉक्टरांनी तपासणी करून दूरदृष्टीचा अभाव असल्याचे निदान केले. मनात विचार आला की ज्या वयात आपल्याला दूरदृष्टी हवी होती त्या वयात कल का सपना किसने देखा असे म्हणत `आज,आता,ताबडतोब` या त्रिसूत्रीच्या प्रभावाखाली होतो.त्यामुळे दूरदृष्टीचा कधी विचारच केला नाही.आता सर्वकाही दृष्टीपथात आले असताना डॉक्टरांनी सांगितले की दूरदृष्टीचा अभाव आहे.त्यांचे म्हणणे मला मान्य करावे लागले.
.खरतर हा शरीराच्या एका अवयवाने दुसऱ्या अवयवाचा केलेला हेवा आहे असे मला वाटते. डोळ्यांना वाटत असेल की आपल्याच खाली असलेल्या नाकाला हा दोन वर्षांपासून मास्क नावाचे आवरण घालून फिरत आहे.मग मला का आवरण नको ? म्हणून डोळ्यांनीही नाकावर टिच्चून बसेल असे आवरण घेतले.नशीब कानांनी अजून काही हेवा केला नाही.
असो. टकल्या म्हणून चिडवणाऱ्या मित्रांना आता चारडोळ्या ,ढापण्या म्हणूनही चिडवायला संधी मिळेल.डोक्यावरच्या निम्म्यापेक्षा जास्त केसांनी आमची साथसंगत सोडली असताना आणि आहेत त्यांनीही पांढरा रंग स्वीकारून आमच्या भरवश्यावर राहू नका असा संदेश देऊन टाकला आहे. अशा वयात फक्त बायकोच लडिवाळपणे म्हणू शकते, 'तेरी प्यारी प्यारी सुरत को किसी की नजर ना लगे चष्मेबद्दूर `,😍

कथा न झालेल्या जुलाबाची

 नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेच्या स्थापनेला यंदा ५० वर्ष (सुवर्णमहोत्सव) पूर्ण होत असून त्यानिमित्त माजी विद...