Friday, June 26, 2009

`अरे थु तुझ्या जिंदगीवर `

दिवाळीच्या काही दिवस आधीची घटना आहे.जगभर मंदीची चाहुल लागली होती.भल्या भल्यांची झोप या मंदीच्या चाहुलीमुळे उडाली होती.मी ही हताशपणे माझ्या अशिलांसमवेत शेअर्स मार्केटचे अवलोकन करत बसलो होतो. माझा व्यवसायच शेअर्स ब्रोकिंगचा असल्यामुळे मला सकाळी ९.५५ ते दुपारी ३.३० पर्यंत कोणताही डिंक न वापरता खुर्चीला चिकटुन बसावे लागते. बरोबर तेवढयाच कालावधीसाठी माझ्या कानाचे आणि माझ्या मोबाईलचे प्रेमसंबंध उत्कट स्थितीला पोहोचलेले असतात.परंतु मंदीचा फटक्यामुळे आता त्यांच्यातही दुरावा निर्माण झालेला होता.म्हनुनच मी त्यादिवशी डोंबारयाच्या ढोलकीचा आवाज ऐकु शकलो.आवाज ऐकताच क्षणी मी खुर्चीतुन उठलो आणि ऑफिसच्या बाहेर आलो.अगदी समोरच डोंबारयाने आपला खेळ चालु केला होता.
एव्हाना आमच्या ईमारतीच्या व्हरांडयात बरयापैकी गर्दी जमली होती.दोघाबाजुने दोन दोन टोकरांनी बांधलेल्या दोरीवर एक चिमुरडी तोल सांभाळत कसरत होती.तीची आई आपल्या आणखी दोन बछडयांना सांभाळत त्या चिमुरडीवर ओरडत होती.माझ्या मुलीपेक्षा वर्षा दोन वर्षानी मोठी असणारी ती चिमुरडी अतिशय निर्विकारपणे त्या उंच बांधलेल्या दोरीवर कसरत करत होती.तिच्या मनात कसलीही भिती दिसत नव्हती.तिचा तो निर्विकार चेहरा पाहुन माझ्या डोळ्यात टपकण पाणी आले.
माझ्याबरोबर अनेक जण तिची कसरत पहात होते.शेजारच्या ऑफिसमध्ये आलेले एक सदगृहस्थ आपल्या कडयावरच्या छकुलीला अतिशय आनंदाने ती कसरत दाखवत होते आणि आपल्या मोबाईलमध्ये त्याचे शुटिंग करत होते.मी डोळ्यातील पाणी पुसत होतो आणि अचानक डोंबार्याची बायको हातात ताट घेऊन पैसे मागायला येताना दिसली. तिला पाहताच आतापर्यंत त्या चिमुरडीच्या कसरतीचा आनंद घेनारे पळायला लागले होते.त्या सर्वांना मी थांबायला लावले आणि प्रत्येकाने १० रुपये देण्याचे भावनीक आवाहन केले.तेथे हजर असलेल्या शिपायापासुन ते मालकापर्यंत सर्वांनी अगदी भरभरुन प्रतिसाद दिला.मात्र आपल्या कडयावरच्या छकुलीला आनंदाने ती कसरत दाखवरया इसमाने( आता मी त्याला सदगृहस्थ म्हननार नाही) माझ्या आवाहनाला भिक घातली नाही.मी त्याला जाणीव करुन दिली कि साहेब तुम्ही त्या पोरिची कसरत दाखवत होतात तेव्हा तुमच्या मुलीच्या चेहर्यावर आनंद ओसंडुन वाहात होता.आणि त्याचेही पैसे देत नसाल तर तुम्ही जी शुटींग केली त्याचे तरी द्या.तेव्हा कुठे त्या इसमाने सुट्टे नाहीत १० रुपये देतो नंतर असे सांगुन शेजारच्या ऑफीसात एंट्री मारली .डोंबार्याचा खेळ संपत आला होता.साहेब १० रुपये देनार नाहीत यावर व्हरांडयातल्या सर्वांचे एकमत झाले होते.मी १० रुपये सोडनार नाही असे सगळ्यांना सांगितले होते.मीही माझ्या स्वभावाप्रमाणे ईरेला पेटलो होतो.तो इसम शेजारच्या ऑफीसमधुन बाहेर पडल्या पडल्या मी पुन्हा माझा घोशा सुरु केला.मी सुट्टे आणुन देतो थोडयावेळात असे म्हनत तो इसम भरकन निघुन रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या दहा बारा लाखाच्या आलिशान गाडीत जाऊन बसला .आम्ही सारेजन त्याच्याकडे पहात होतो.त्यानेही आमच्याकडे पाहीले आनि गाडी चालु केली .त्याक्षणी माझ्या तोंडतुन जोरदारपणे आवाज निघाला.....`अरे थु तुझ्या जिंदगीवर `

Friday, February 20, 2009

लोकसभा निवडणुकीच्या निमीत्ताने काही ...

साधारण या वर्षीच्या एप्रिल मे महीन्यात संपुर्ण भारत लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जानार आहे.अशावेळी माझ्या मनात प्रश्न निर्माण होतो कि स्वातंत्र्यानंतर जवळपास ६० वर्षाहुन अधिक काळ लोटल्यानंतरही आपण खरेच स्वतंत्र आहोत का ?? १९४७ पुर्वी आपल्यावर ब्रिटीशांची जुलमी राजवट होती आणि त्यानंतर आपल्यावर भ्रष्ट्राचारी,लबाड,कलंकीत,गुन्हेगारी प्रवृत्तीच्या राजकारन्यांनी राज्य केले.त्यांनी केवळ राज्यच केले असे नाही तर बहुमताच्या नावाखाली लोकशाहीची क्रुर अवहेलना केली.मनमोहन सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव ,शिबु सोरेन यांचे विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतरही झारखंडचे मुख्यमंत्रीपद न सोडणे ही त्याची ताजी उदाहरणे आहेत.अशा नेत्यांमुळे भारत कधीही एक सशक्त राष्ट्र म्हणुन विकसीत होउ शकला नाही.त्यामुळ स्वातंत्र्यप्राप्तीच्यावेळी पाहीलेल्या स्वप्नांचा आज पार चुराडा झाला आहे.
हे असे का झाले ? याचा जर विचार केला तर मी काही प्रमाणात दोष जनता जनार्दनालाच देईन.केवळ आंधळेपनाने एखाद्या पक्षाचा अनुनय करुन जनता कोनत्याही ऐर्या गैर्या उमेदवाराला निवडुन देत आली आहे.मात्र आता हे कुठेतरी थांबायला हवे आहे.त्यासाठी सुज्ञ मतदारांनीच आता पुढाकार घेतला पाहीजे.पुढार्यांना आता जाणीव करुन देन्याची वेळ आली की ते आता लोकांना अधिक काळ वेडयात काढु शकत नाही.खाली दिलेल्या माझ्या काही कल्पना जर सगळयानी अमलात आणल्या तर देशाचे थोडेशे तरी ऋण फेडल्याचे आपल्याला समाधान मिळेल.
१)भारताच्या सर्व नागरीकांनी मतदानाचा हक्क बजावलाच पाहीजे.
2)वयाची ७० वर्ष पुर्ण केलेल्या कोनत्याही उमेदवारास मतदान करु नये मग तो नेता कितीही मोठा असला तरीही.
3)गुन्हेगारी प्रवृतीच्या,भ्रष्ट्राचारी अशा उमेदवारास मतदान करु नये.
४) जातीय प्रवृतीच्या उमेदवारास मतदान करु नये.
५)अनेक लोक फक्त सरकारच्या निष्काळजीपणाबद्दल,अकार्यक्षमतेबद्दल गळा काढत असतात,पण मतदानास जात नाहीत. अशा लोकांना बळजबरीने मतदानास प्रवृत्त करावे.
६)अकार्यक्षम उमेदवार,जो संसदेत जाऊन फक्त झोपा काढणार असेल अशा उमेदवारास मतदान करु नये.
७)विधानसभेत किंवा संसदेत जाऊन फक्त धुडगुस घालन्यात ज्यांना मुर्दुमकी वाटत असेल अशा उमेदवारास मतदान करु नये.
८)वेळोवेळी पक्ष बदलुन स्वतःचे स्वार्थ साधत असेल अशा उमेदवारास मतदान करु नये.
९)दहशतवादी,नक्षलवादी किंवा इतर देशविघातक शक्तींशी संबंध असेल अशा उमेदवारास मतदान करु नये.
आणि सगळ्यात महत्वाचे
१०)सुशिक्षीत ,जो कमीत कमी १० वी पास असेल अशाच उमेदवारास मत द्यावे.