Wednesday, November 4, 2009

जनतेच्या सहनशिलतेचा अंत पाहु नका.
नाशिक शहरामध्ये पुन्हा एकदा गुंडांनी हैदोस घालायला सुरुवात केली आहे.या गुंडांची कार्यपध्दतही जगावेगळी आहे.जनतेमध्ये भय पसरवण्यासाठी हे गुंड मोटारसायकल जाळन्यासारखे संतापजनक प्रकार करत आहेत.विधानसभा निवडनुकीच्या काही आठवडे आधी सिडको य उपनगरात एकाच रात्री ४० मोटरसायकल्स जाळन्याचा प्रकार घडला होता.त्या प्रकरणात राज ठाकरे यांच्या पक्षाचा पदाधिकारी सुहास कांदे व रिपाई च्या जिल्हाध्यक्षाचा मुलगा प्रमुख संशयीत होते .पोलिसांनी त्यांच्यावर कारवाईची कुर्हाड उगारताच सरकारने पोलिस आयुक्तांची चक्क बदलीची ऑर्डर पाठवुन दिली.यावरुन नाशिकच्या जनतेला कळुन चुकले कि या गुंडाच्या पाठीमागे कोणाचे बळ आहे.मात्र या गुंडाच्या त्रासाला व त्याच्या पोशिंद्याना कंटाळलेली जनता पोलिस आयुक्तांच्या बदली विरोधात अभुतपुर्वपणे आणि स्वयंस्फुर्तीने रस्तावर ऊतरली. पोलिस अधिकार्याची बदली रद्द व्हावी यासाठी जनता रस्त्यावर येन्याचा संपुर्णॅ भारतात हा पहिलाच प्रसंग असावा. जनतेच्या दबावापुढे झुकुन त्यावेळस पोलिस आयुक्तांची बदली रद्द करन्याची नामुश्की सरकारवर आली होती.मात्र येनारी विधानसभा निवडनुक निर्विघ्नपने पार पडावी म्हनुन सरकारातील चाणाक्ष मंत्र्यांनी दोन पाउल मागे येणे पसंत केले.पोलिसांनी ही संधी मानुन शहरातील गुंडगिरी मोडुन काढन्याचा विडा ऊचलला .या मोहीमेत कुख्यात गुंड कातारीचा एन्काऊन्टर करन्यात आला तर मोटारसायकल जळीत प्रकरनातील आरोपींना तडीपार करन्यात आले.मात्र आरोपीनी न्यायालयाचे दरवाजे ठोठवुन आणि जामिन मिळवुन पोलिसांविरुद्धची पहिली लढाई जिंकली.मोटारसायकल जळीत प्रकरनातील प्रमुख आरोपी असलेल्या सुहास कांदेने तर यावरही कडी करत नांदगाव विधानसभा मतदार संघातुन छगन भुजबळांचे पुत्र पंकज भुजबळांविरोधात ऊमेदवारी अर्ज भरुन दंड थोपटले.मात्र प्रत्यक्ष निवडणुक लढन्यापेक्षा भुजबळांशी यशस्वी तह केल्याची चर्चा जनतेत आहे .तेव्हाच खरे तर नाशिकच्या जनतेला आपल्या भविष्यातील संकटाची जाणीव झाली होती. कालच्या सातपुर येथील मोटारसायकल जळीत प्रकरनाने पुन्हा एकदा नाशिकच्या जनतेला जीव मुठीत घालुन जगावे लागनार आहे.मात्र या गुंडानी व त्यांच्या पोशिंद्यांनी हे ही लक्षात ठेवावी की नाशिकची जनता जितकी सहनशिल आहे तितकीच प्रखरतेने ती अन्याया विरोधात पेटुनही ऊठते.पोलिस आयुक्तांच्या बदली प्रकरणात याची चुनुक सगळयांनी अनुभवली आहे.त्यामुळे या गुंडानीं वेळीच आपली शेपुट गुंढाळावी नाहीतर नाशिककर यांना आसमान दाखवल्यशिवाय राहनार नाही.पोलिसांवर कोणी नेता दबाव आणत आहे असे जर जनतेच्या लक्षात आले जनता स्वताच कायदा हातात घेऊन या गुंडांचा आक्कु यादव केल्याशिवाय राहनार नाही .कारण ही भुमी रावणाचा वध करनार्या प्रभु रामचन्द्राची आहे .

कथा न झालेल्या जुलाबाची

 नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेच्या स्थापनेला यंदा ५० वर्ष (सुवर्णमहोत्सव) पूर्ण होत असून त्यानिमित्त माजी विद...