माझे
म्हणने पटतेय
का बघा
!!!
मित्रांनो,हा फोटो
आहे भारतातील
आघाडीचे उद्योगपती
अजय पिरामल
यांचा.त्यांच्या
सोबत आहेत
त्यांच्या पत्नी स्वाती पिरामल.वृत्तपत्र
वाचताना सहज
या फोटोकडे
लक्ष गेले
आणि दोघांच्या
उंचीतील फरक
लगेच डोळ्यात
भरला.अजय
पिरामल साहेब
जवळपास सहा
फुट तर
स्वाती पिरामल
यांची अंदाजे
पाच फुट.मनात विचार
केला,लग्न
करताना यांनी
उंचीचा विचार
केला नसेल
का ??
मित्रांनो,यांनीसुद्धा
उंचीचा विचार
निश्चितच केला
असेल.पण
शारिरीक नाही
तर त्यांनी
एकमेकांच्या कर्तुत्वाच्या उंचीचा विचार केला
असेल.असे
फक्त असाधारण
लोकच करु
शकतात,तुम्ही
आम्ही नव्हे
!!! कारण स्वाती
पिरामल नुसत्या
अजय पिरामल
यांच्या पत्नी
नाहीत तर
त्यासुद्धा कंपनीच्या संचालक आहेत.म्हणजे
अजयरावांच्या खांद्याला खांदा लावुन त्या
कंपनीच्या प्रगतीत सहभागी आहेत.
असेच उदाहरण
मी अमिताभ
बच्चन आणि
जया बच्चन
यांचे देऊ
शकतो.सचिन
तेंडुलकर आणि
त्यांच्या पत्नीचे तर आगळेवेगळे उदाहरण
आहे.सचिन
अल्पशिक्षित तर अंजली डॉक्टर.शिवाय
दोघांच्या वयात ,उंची यात ही
फरक. अंजली
सचिनपेक्षा चार वर्षानी मोठी !!!
मग मी
विचार करतो
,आपणच का
लग्न करताना
उंची,रंग,
वय याचा
नको तेवढा
किस काढतो
??आपण का
कर्तुत्वाला किंमत देत नाही. या
क्षुल्लक गोष्टींचा
किस काढता
काढता लग्नाचे
वय निघुन
जाते आणि
नंतर पश्चातापाशिवाय
हातात काहीच
राहात नाही
.
मित्रांनो आणि मैत्रींणींनो,अजुनही वेळ
गेली नसेल
तर विचार
करा.माझे
म्हणने पटतेय
का बघा
!!!