Monday, October 14, 2013

`देशी` पिणार नाहीत,पण `इंग्लिश`प्यायला मोकळे !!

                                   काही दिवसांपूर्वी  माझ्या जवळच्या नातेवाईकाच्या दशक्रियाविधीसाठी रामकुंडावर गेलो होतो.सकाळी सकाळी ऊन तडाखा देत होते.जमलेल्यांपैकी काहीजण हास्यविनोदाची फवारणी करत दु:खद वातावरण हलकेफुलके करण्याचा जाणिवपुर्वक प्रयत्न करत होते.त्यांच्यापैकी काहिजणांचे भटजींच्या पुजेकडेही बारकाईने लक्ष होते.पुजा चालु असताना भटजीबुवांनी फर्मान सोडले,`आता मृताच्या मुलामुलींनी वर्षभर एखादे व्यसन सोडण्याचा संकल्प करा.`मग मुलामुलींपैकी काहिंनी वर्षभर तंबाखु खाणार नाही तर काहींनी तपकीर लावणार नाही असा संकल्प केला.त्यांच्यापैकी एक नुकतेच सरकारी खात्यातुन (खाऊनपिऊन)उच्चपदस्थ अधिकारी म्हनुन निवृत्त झाले आहेत.त्यांनी चहा सोडण्याचा संकल्प केला.तेवढयात गर्दीतल्या काहिंनी भटजींना विनंती केली,`गुरु यांना दारु सोडायला सांगा.`काहिंनी लगेच विरोधी सुर लावला,`नको नको,आमची वर्षभर गैरसोय होईल,आम्हाला जोडिदार राहणार नाही.`अर्थात हा सगळा हास्यविनोद चालु होता.भटजीबुवाही यात सामिल झाले.त्यांनी संकल्पकर्त्याला पुन्हा संधी दिली,`बघा तुमच्या मित्रमंडळींची आणि नातेवाईकांची ईच्छा पुर्णॅ करा.
                                                                  साहेबही फार हुशार.आक्ख्या नोकरीत त्यांनी चांगल्या चांगल्या गावपुढार्यांना आणि भल्या भल्या मंत्र्यासंत्र्यांना `शाळा`शिकवली आणि पुरुन ऊरले.ते यांच्या कोंडीत सापडतील कसे ??त्यांनीही मध्यममार्ग स्विकारला आणि सगळ्यांना ऐकु जाईल अशा आवाजात संकल्प केला,`आईच्या स्मृतीस वंदन करुन मी संकल्प सोडतो की आजपासुन वर्षभर देशीदारु पिणार नाही`.हे ऐकुन सगळे शोकाकुल हास्यकल्लोळात बुडुन गेले.आता साहेब वर्षभर `देशी` पिणार नाहीत,पण `इंग्लिश`प्यायला मोकळे !!!!

Tuesday, October 8, 2013

संशयितांची `संशयित रेखाचित्रे`

                                                         नरेंद्र दाभोळकरांची हत्या होऊन महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला.तपास चालू असून तो कुठल्याही निर्णायक स्थितीत पोहोचला नाही.आतापर्यंत शेकडो संशयितांची चौकशी झाली परंतु पोलिसांच्या हातात काहीच आले नाही .एखादा गुन्हा घडला की संशयितांचे रेखाचित्र तयार करून तपास केला जातो.दाभोळकरांच्या घटनेनंतर सुद्धा हे सोपस्कार पार पाडण्यात आले .हल्लेखोर दोन होते म्हणून दोन रेखाचित्रे तयार करून प्रसिद्धीस दिले गेले .मात्र काल पुन्हा सात आठ नवीन रेखाचित्रे तयार केली गेली.मुळात हल्लेखोर दोघेच होते मग रेखाचित्रे जास्त कशी ? सगळीच परिस्थिती  गोंधळाची ! पोलिसांच्याच भाषेत सांगायचे तर हा निव्वळ हवेत गोळीबार करण्यासारखा प्रकार आहे.
                                  मुळात अशी रेखाचित्रे काढणे हाच हास्यास्पद प्रकार आहे .कोणीतरी प्रत्यक्षदर्शिने भेदरलेल्या परिस्थितीत काहीतरी अर्धवट सांगितलेल्या माहितीच्या आधारे रेखाचित्रे काढली जातात.आणि तोच धागा पकडून तपास भरकटत जातो आणि खरे आरोपी मजा मारत फिरतात.दाभोळकरांची केस ही `मोस्ट  सेन्सिटीव `आहे नाहीतर पोलिसांनी अशा रेखाचित्रांच्या आधारे कोणतेतरी दोन संशयित पकडून काम पुढे चालू ठेवले असते .अगदीच गावरान भाषेत सांगायचे म्हणजे `करून गेला दाढीवाला ,पकडून आणला मिशीवाला `या नेहमीच्याच पोलिसांच्या प्रचलित पद्धतीचा अवलंब केला गेला असता.वरून गुन्ह्याचा तपास लागला म्हणून स्वतःची पाठ थोपडून घेतली असती .असो .
                      तपास मात्र चालू आहे .आपल्या नेहमीच्या `वाट पाहण्याच्या `वृत्तीने महिनोन्महिने या तपासावर लक्ष ठेवू या .तोपर्यंत ही सात आठ संशयितांची रेखाचित्रे सुद्धा एकमेकांकडे संशयाने पाहू लागतील आणि गुन्ह्याची उकल आपोआप होईल.  

Saturday, October 5, 2013

एक्का , दुर्री , तिर्री


 भोपाळच्या बाल सुधार गृहातून ३५ बाल गुन्हेगार पळून गेल्याची बातमी वाचली आणि मला पंधरा वर्षापूर्वीची घटना आठवली .मालेगावला बालगुन्हेगारांच्या एका टोळीने तेव्हा धुमाकूळ घातला होता.पाच जणांच्या टोळीतल्या या बालकांनी पोलिसांच्या अक्षरश: नाकात दम आणला होता.चिल्ले पिल्ले होते पण भलतेच सराईत होते. त्यांची खरी नावे अब्दुल ,अल्ताफ अशी काहीतरी होती पण त्यांचे टोपण नावं मात्र अफलातून होते.टोळीच्या म्होरक्या चे नाव होत एक्का तर इतर दोघे होते दुर्री तिर्री .उरलेले दोघे खूपच लहान होते ,त्यांचे नावं होती चवन्नी ,आठन्नी .

कथा न झालेल्या जुलाबाची

 नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेच्या स्थापनेला यंदा ५० वर्ष (सुवर्णमहोत्सव) पूर्ण होत असून त्यानिमित्त माजी विद...